Tuesday, May 8, 2007

आजच्या इ-सकाळची 'गं'मत चाचणी!


मोब्लॉबिंग हा एसएमएसला पर्याय ठरेल, असे वाटते का?

१. हो
२. नाही
३. माहित नाही

मुळात महाजालावर ब्लॉग लिहिणे आणि एस्एम्एस् करणे या दोन गोष्टींचा एकमेकांशी काय संबंध आहे?

या दोन्ही कल्पना पुर्णपणे वेगळ्या आहेत. दोन्ही गोष्टींचे मुलभूत उद्देश वेगळे आहेत. एस्एम्एस् केला जातो आपला निरोप फक्त इच्छित व्यक्तीपर्यंत तत्काळ पोचवण्यासाठी तर जालनिशी लिहिली जाते आपले विचार सर्वांपर्यंत कायमस्वरुपी पोचवण्यासाठी किंवा नोंद ठेवण्यासाठी. एस्एम्एस् चे आयुष्य मर्यादित असते. सर्वसाधारणपणे दुसऱ्या व्यक्तीला निरोप मिळाला कि एस्एम्एस् चे अस्तित्व संपुष्टात येते. तर आपले जालनिशीवरचे लेख नेहमीच उपलब्ध रहावेत अशी लिहिणाऱ्याची इच्छा असते.

इलेक्ट्रॉनिक्स, संगणक आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात होणाऱ्या प्रगतीमुळे एखादे उपकरण दुसऱ्याला जोडणे, एका उपकरणाकडून माहिती घेऊन दुसऱ्याला देणे तितकेसे अवघड राहिलेले नाही. जालनिशी तुम्ही संगणकाचा दृश्यफलक व कळफलक वापरुन लिहा किंवा मोबाईलचा दृश्यफलक व कळफलक वापरुन लिहा, अर्थ एकच. एखादी गोष्ट करण्यासाठी मार्ग कुठलाही वापरा, हवा तो परिणाम साध्य झाला म्हणजे झाले.

मोबाईल वरुन एस्एम्एस् करणे किंवा संगणकाचा वापर करुन याहू किंवा तत्सम मेसेंजर वरुन एस्एम्एस् करणे यातही तसाच काहीही फरक नाही. मार्ग दोन परिणाम एक.

सकाळच्या कोणा नव/उप/कार्यकारी/सहसंपादकाला हि कल्पना सुचली ते मुख्यसंपादकच जाणोत. आश्चर्याची गोष्ट अशी की इ-सकाळच्या वाचक वर्गापैकी ४०% पेक्षा जास्त वाचकांना मोब्लॉगिंग हा एस्एम्एस् ला पर्याय वाटतो!!!




तुम्हाला काय वाटतं?

No comments: